
सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक बघता चिंता वाटते, मुख्यमंत्र्यांनी भाजपला फटकारले
नियमांचा भंग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्र म आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक बघता चिंता वाटते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रा काढणाऱ्या भाजपला फटकारले आहे.भाजपच्या या यात्रांमुळेच करोना वाढण्याची भीती मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी व्यक्त करण्यात आली.
विरोधकांना जे राजकारण करायचे ते करू द्या, तो करोना वाढविणारा पक्ष आहे, पण किमान महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तरी खबरदारी घेऊन पुढील दोन-तीन महिने गर्दीचे राजकीय, धार्मिक कार्यक्रम टाळावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना के ली.
www.konkantoday.com