
जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजनेविषयी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणीवर
ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून सदर योजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे होय. याविषयी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मा. डॉ. इंदुराणी जाखड यांची श्रीम. पुर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून गुरूवार दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ७.२५ वाजता प्रसारित होईल. हा कार्यक्रम ११४३ किलोहर्टस् या मध्यमलहरी वाहिनीवर ऐकता येईल. तसेच न्यूज ऑफ एअर या मोबाईल ऍपवरसुद्धा हा कार्यक्रम यावेळी सर्वत्र ऐकता येणार आहे.
तसेच सदरच्या मुलाखतीमध्ये जल जीवन मिशन कार्यक्रम व गाव कृती आराखडा याबाबत माहिती देणार असून जिल्ह्यामधील सर्व ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे www.konkantoday.com