आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद

आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे नुकतीच घोषित केली. विजेत्यांना ५००, १००० आणि १५०० रुपयांची पुस्तके खरेदी करण्यासाठी व्हाऊचर्स देण्यात आली आहेत. पुस्तकपेढीतर्फे या खरेदीवर आणखी सवलत देवून जादा पुस्तके घेण्याची संधी विजेत्यांना लाभली आहे. पाचवी ते सातवीच्या गटासाठी स्वच्छ भारत मिशन व आठवी ते दहावीच्या गटासाठी आत्मनिर्भर भारत मिशन असे विषय स्पर्धेसाठी दिले होते. स्पर्धेचे परीक्षण दुहिता सोमण-खेर यांनी केले. आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनचे संस्थापक, उद्योजक नंदकुमार पटवर्धन यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. कोरोना काळात सर्वांनी काळजी घ्यावी, ऑनलाईन उपक्रम आयोजित करणार असल्याची माहिती नंदकुमार पटवर्धन यांनी दिली. स्पर्धेचा निकाल पाचवी ते सातवी प्रथम -निषाद हिरवे, द्वितीय-श्रीषा घोरपडणकर, तृतीय-वेदांत शेलार, आठवी ते दहावी प्रथम- रिद्धीमा कुलकर्णी, द्वितीय-हर्षिता नाईक, तृतीय-दर्शिका राऊत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button