
अहवाल उशीरा येत असल्याने गावांमध्ये अशा व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढले
गावात होणार्या कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह असलेल्यांची नावे ग्राम कृती दल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात नसल्याने गावांमध्ये या रूग्णांना विलगीकरणात किंवा रूग्णालयात दाखल करण्यास विलंब होत आहे. तसेच अहवाल उशीरा येत असल्याने या गावांमध्ये अशा व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभाग व ग्राम पातळीवरील यंत्रणा यामध्ये समन्वय नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधित समोर येऊ लागले आहेत. परंतु चाचण्या झाल्या तरीही त्यांचे अहवाल उशिरा येत असल्याने या कालावधीत चाचणी केलेली व्यक्ती बाधित असेल तरीही तिचा अहवाल येण्यासाठी अनेक दिवस लागत असल्याने या कालावधीत ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग वाढू लागला आहे.
www.konkantoday.com