
कार्यालय प्रमुख, विभागप्रमुख यांच्या लेखी परवानगीशिवाय जिल्हा परिषद भवनात कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश
कार्यालय प्रमुख, विभागप्रमुख यांच्या लेखी परवानगीशिवाय जिल्हा परिषद भवनात कोणालाही प्रवेश न देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत. आरोग्य वगळता उर्वरित विभागात ५० टक्के उपस्थिती ठेवण्यात यावी, अशी सूचना डॉ. जाखड यांनी केली आहे.
रत्नागिरी, चिपळूण बांधकाम वित्त विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा आदी विभागातील महत्वाची वर्षअखेरीचे प्रशासकीय कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. हे कामकाज वेळीच पूर्ण व्हावे यासाठी कार्यरत अधिकारी, कर्मचार्यांनी संबंधित विभाग प्रमुखांच्या सुचनेनुसार परिषद भवनात उपस्थित रहावयाचे आहे.
www.konkantoday.com