
कोकणातील चिरेखाण व्यवसायाला परवानगी मिळावी माजी आमदार विनय नातू यांची मागणी
कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून त्याला परवानगी मिळावी. अशी मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डाँ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून यामध्ये अनेक परराज्यातील व परजिल्ह्यातील कामगार या ठिकाणी काम करतात. गणपतीनंतर या व्यवसायातील सुरुवातीचे तयारीचे विषय पूर्ण करुन पाऊस कमी झाल्यावर या व्यवसायाची सुरुवात होते. निसर्ग चक्रीवादळामुळे पडलेल्या घरांची दुरुस्ती तसेच नवीन घर इमारतींची बांधकामे व लाँकडाऊनच्या काळात अनेक बांधकामे अपूर्ण राहिलेली आहेत.
www.konkantoday.com