काेव्हिड रुग्णालयाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का ?तातडीने लक्ष्य घालणे गरजेचे

रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील काेव्हिड रुग्णालयाबाबत रोज नवे नवे प्रकार उघड होत असून यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व प्रशासन यांनी एकत्र येऊन तेथील समस्या जाणून घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहेत
रत्नागिरीतील कोव्हिड रुग्णालयाच्या कारभाराबाबत एक एक प्रकार उघड होत आहेत औषधे व महागडी इंजेक्शने याबाबत कोणताही खुलासा होत नाही सध्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवर भार पडत चाललाय या व्यवस्थेत काम करणारे काही डॉक्टर व आरोग्य कर्मचारी स्वतः काेराेना बाधित झाले आहेत कोरोना स्वॅपची तपासणी करणारे प्रमुख डॉक्टर देखील कोरोना बाधित झाले आहे त्यामुळे या यंत्रणेवर ताण आला आहे गेल्या तीनचार दिवसांत या रुग्णालयाबाबत तसे प्रकार घडले आहेत की त्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून काेराेना बाधित रुग्ण कोणालाही न सांगता निघून गेला यांचा यंत्रणेला थांगपत्ता नव्हता याशिवाय रुग्णांच्या नातेवाईक लोकांकडूनही दबाव आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांवर येत आहे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीने त्याचा अंत्यसंस्कार होणे आवश्यक असताना व त्यासाठी वेगळे पथक केले असताना देखील नातेवाईक स्वतः अंत्यसंस्कार करीत आहेत असल्याचे एक दोन प्रकार घडले आहेत ही गंभीर गोष्ट आहे असेच चालत राहिल्यास कोरोना पसरण्यास वेळ लागणार नाही असे प्रकार घडूनही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन त्याबाबत कारवाई करत असल्याचे दिसत नाही गेल्या काही दिवसात मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना कोविड रुग्णालयात नेण्यास विरोध करीत असल्याच्या घटनाही घडू लागल्या
आहेत एकीकडे शासन चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आणण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सक्षम व पुरेशी आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे रत्नागिरीसह चिपळूण व अन्य भागात रुग्णालये वाढवण्याच्या घोषणा झाल्या असल्या तरी त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर व नर्स यांची कमतरता आहेही वस्तूस्थिती आहे सध्या कोव्हिड रुग्णालयातील स्टाफ गेले चार महिने विश्रांती न घेता काम करीत आहे त्यांच्यावरही प्रचंड ताण आहे या सर्वाचा विचार करता रत्नागिरी वासियांसाठी सर्व लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष प्रशासन यांनी काेव्िड रुग्णालयाची वस्तुस्थिती जाणून घेऊन एकत्र येऊन मार्ग काढावा अशी जनतेची मागणी आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button