
रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावातील सात वाड्यांनी कोरोना रोखण्यासाठी १४ दिवस सामुदायिक कॉरंटाईन करून घेण्याचा निर्णय
मुंबईहून येणार्या चाकरमान्यांमुळे काही गावात कोरोना रूग्ण सापडत असून तालुक्यातील वाटद गावातील दोन वाड्यांमध्ये कोरोनाचा रूग्ण सापडल्याने या परिसरातील सात वाड्यांनी स्वतःहून चौदा दिवस सामुदायिक कॉरंटाईन होण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. शासनाने आधीच्या नियमात शिथिलता दिल्याने लोकांची ये-जा वाढली होती. मात्र वाटद गावातील दोन वाड्यांत दोन रूग्ण सापडले होते. त्यामुळे गावातील कवठेवाडी, धोपटवाडी, तांबटकरवाडी, किंजळेवाडी, रायवाडी व वडवली, पूर्व बौद्धवाडी या वाडयांनी १५ जूनपासून पुढील १४ दिवस सामुदायिक कॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये सातही वाड्यांतून बाहेर येणे-जाणे यावर बंधन घालण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंद करावी अशी मागणी त्यांनी तलाठी, जयगड पोलीस व वाटद सरपंच यांना निवेदन देवून केली आहे.
www.konkantoday.com