
भटक्या मुक्या प्राण्यांसाठी धावला रत्नागिरीतील जैन समाज
रत्नागिरी शहरात सध्या सर्व बाजारपेठा व दुकाने बंद असल्याने अजिबात रहदारी नाही.रस्त्यावरून फिरणार्या मोकाट मुक्या प्राण्यांचा अन्नाचा प्रश्न देखील निर्माण झाला होतो.त्यांची उपासमार होऊ नये म्हणून रत्नागिरीतील जैन बांधव धावून आले.जैन समाजाच्यावतीने रत्नागिरी शहर परिसरातील मुक्या प्राण्यांसाठी दररोज ५०० चपात्या व बिस्किटे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.हा उपक्रम सुरू करण्यामागे मुकेश गुंदेचा यांची प्रेरणा आहे.विशेष म्हणजे या मुक्या प्राण्यांसाठी कुठल्याही उरलेल्या चपात्या न वापरता त्यांच्यासाठी दररोज ताज्या चपात्या बनवल्या जातात. गेल्या दोन आठवड्यांपासून हा उपक्रम सुरू आहे.या उपक्रमांमध्ये जैन समाजातील मुकेश गुंदेचा,विशाल जैन, दिलीप संघवी,चेतन गांधी, सचिन जैन,जितेंद्र परमार, नीलेश शहा यांचा सहभाग आहे.मुक्या प्राण्यांसाठी जैन समाजाने चालविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

