
कदाचित तीन महिन्यात एलपीजी सिलिंडर बंद होईल, छगन भुजबळांच्या वक्तव्यामुळे नागरिकांच्यात संभ्रम
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका महाराष्ट्रातील नागरिकांना बसत आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे मोठे एलपीजी संकट निर्माण झाले आहे. एकीकडे केंद्राकडून एलपीजी गॅसचा मुबलक पुरवठा असल्याचे विधान सातत्याने करण्यात येत आहे, तर दुसरीकडे गॅस वितरकांच्या ऑफिस बाहेर नागरिकांच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत. अशामध्ये आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (२८ मार्च) दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठा भ्रम निर्माण होत आहे.
www.konkantoday.com



