निवडणुकीचे साहित्य सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल पध्दतीने लावण्यास निर्बंध


रत्नागिरी, दि.6 ):- निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (आचारसंहिता कालावधीत) निर्बंध घालीत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

   राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 साठीचा कार्यक्रम दि. 4 नोव्हेंबर 2025 घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीची  संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकी संबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स,कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे जिल्हादंडाधिकारी श्री. जिंदल यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) अन्वये त्यांना प्रदान असलेल्या शक्तीचा वापर करुन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (आचारसंहिता कालावधीत)  निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निर्बंध घातले आहेत.

तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात म्हटले आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button