रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प.

दिवंगत माजी पंतप्रधान व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाट्ये समुद्रकिनारी वाळू शिल्प साकारले आहे. या वाळूशिल्पाचे उदघाटन भाजपाचे नेते तथा माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते रविवारी करण्यात आले.हे वाळू शिल्प शिल्पकार अमित पेडणेकर यांनी साकारले आहे.

रविवारी दुपारी उदघाटनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, सुशांत पाटकर, उमेश देसाई, संकेत कदम, दादा ढेकणे, निलेश आखाडे, राजेंद्र फाळके, शिल्पा मराठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी रत्नागिरीतील नागरिक तसेच येथे येणार्‍या पर्यटकांना एक पर्वणी ठरणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button