नवीन शैक्षणिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्राथमिक विभाग सज्ज
सर्वत्र कोरोनाची धास्ती असली तरी नवीन शैक्षणिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्राथमिक विभाग सज्ज झाला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ३१ हजार ४० विद्यार्थ्यांना ६लाख ४४ हजार ९६मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालभारतीकडे पुस्तकाची मागणी केली आहे. ही पुस्तके ५जूनपर्यंत उपलब्ध होतील, असे सांगण्यात येत आहे. ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर तालुका स्तरावरील गटशिक्षणाधिकार्यांकडून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पोहोचवण्यात येणार आहेत. केंद्रस्तरावरून त्या-त्या शाळांना ही पुस्तके देण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके कशी मिळतील याचे नियोजन करण्यात आले आहे मात्र, कोरोनामुळे शाळा कधी सुरू होणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. शिक्षण विभाग मात्र शाळा सुरू करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
www.konkantoday.com