रत्नागिरीत जन आशीर्वाद यात्रेत हात की सफाई करीत सोन्याच्या चैन लांबवणार्‍य‍ा आणखी चार आरोपींना अटक

भाजपतर्फे रत्नागिरीत करण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेत ४ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या चेन लांबवाणार्‍या अन्य ४जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारही ही जप्त करण्यात आली असून बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत केली आहे.त्यांच्या बाळू तुळशीराम जाधव (२८,मुळ रा.बिड)या साथिदाराला पोलिसांनी याआधिच ताब्यात घेतले असून तो पोलिस कोठडीत आहे. दत्‍ता ज्ञानेश्‍वर गुंजाळ (३३), सागर आत्माराम कारके (२१), नितीन अंकुश गायकवाड आणि रमेश शंकर जाधव ( सर्व रा.बिड) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या चौघांनाही शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री बिड येथून ताब्यात घेतले तसेच या गुन्ह्यातील चार चाकी वाहन ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पाच जणांनी संगनमताने २७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथील जन आशिर्वाद यात्रेत गर्दीचा फायदा उठवत ४ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्या होत्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button