तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सुविधा कार्यान्वित

बीएसएनएलच्या तांत्रिक बिघाडामुळे मागील २-३ आठवडे बंद असलेली राजापूर पोस्ट कार्यालयातील रेल्वे आरक्षण सेवा आता बीएसएनएल सेवेतील तांत्रिक बिघाड दूर झाल्याने पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पोस्ट कार्यालयामध्ये रेल्वे आरक्षण करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.स्थानिक जनतेसह लोकप्रतिनिधींकडून सातत्याने केलेल्या प्रयत्नानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने राजापूर पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण सेवा कार्यान्वित केली आहे. मुंबईसह देशभरात कुठेही प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण राजापूर पोस्ट कार्यालयातून मिळत आहे. राजापूर पोस्ट कार्यालयात एक स्वतंत्र खिडकी उघडून तेथून रेल्वे प्रवाशांना तिकिटे सहज उपलब्ध होत आहेत. गेल्या काही महिन्यात तालुक्यातील प्रवाशांनी रेल्वे आरक्षण सेवेचा चांगला लाभ घेतला आहे. यात दैनंदिन मुंबईकडे जाणार्‍या व परत येणार्‍या प्रवाशांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र गेल्या २-३ आठवड्यापासून अधिक काळ बीएसएनएल सेवेत निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे राजापूर पोस्ट कार्यालयातील  रेल्वे आरक्षण सेवा ठप्प झाली होती. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button