भोस्ते घाटातील अवघड वळणावर सतत होणाऱ्या अपघातांवरही अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना नाही

मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील भोस्ते घाट चौपदरीकरणानंतर वाहतुकीला सुलभ झाला असला तरी एक तीव्र उतार असलेले नागमोडी वळण मात्र वाहनचालकांना डोकेदुखी ठरले आहे. गोव्यातून मुंबईच्या दिशेने घाट उतरताना अवजड वाहनांचे या वळणावर चौपदरीकरण काम झाल्यावर अनेकदा अपघात झाले आहेत.तीव्र उतार व यू इंग्रजी आकाराचे हे वळण माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या अनुभवी चालकांना धोकादायक ठरले आहे.
भोस्ते घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, घाटाच्या बाजूला केलेल्या डोंगर कटाईमुळे गेल्यावर्षी तब्बल पाचवेळा भूस्खलन होऊन महामार्गाची एक बाजू पूर्णपणे ठप्प झाली होती. , भोस्ते घाटातील धोकादायक आणि संभाव्य दरड प्रवण क्षेत्रातील दरड अजूनही हटविण्यात आली नाही. तसेच भोस्ते घाटातील अवघड वळणावर सतत होणाऱ्या अपघातांवरही अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे घाटातील प्रवास अजूनही सुकर झालेला नाही. पावसाळ्यात जपूनच प्रवास करावा लागणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button