काही राजकीय लोक खड्डय़ांचे राजकारण करीत आहेत -आ.उदय सामंत

रत्नागिरी शहरात पडलेल्या खड्डय़ांचे काही राजकीय लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत निवडणूक आल्यानंतर यांना शहरातील विविध समस्यांची जाणीव होते.मात्र शहरवासियांना खरी वस्तुस्थिती माहिती आहे असे म्हाडाचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी शहरातील खड्डे प्रकरणावरून बोलताना सांगितले.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे ही वस्तुस्थिती मान्य आहे.परंतु अतिवृष्टी झाल्यामुळे हे खड्डे पडले आहेत. रत्नागिरी नगर पालिकेने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही.पाऊस कमी झाल्यानंतर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील आवश्यकता भासल्यास आपण आपली खाजगी यंत्रणा वापरून शहर खड्डेमुक्त करू असे आश्वासन सामंत यांनी दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button