राजापुरात पावसाची विश्रांती

नागरिक सुरक्षित : जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

राजापूर : दोन दिवसाच्या मुसळधार पावसानंतर रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने राजापूर शहरासह तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पावसाने उसंत घेतली असली तरीही प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे;
राजापूर शहरातील पुराची पाणी पातळी मंगळवारी रात्रीपासून हळुहळु ओसरू लागली होती; मात्र पहाटे जवाहर चौक पूर्ण पुरमुक्त झाला आहे. शहरातील अन्य भागातील पुराचे पाणीही ओसरले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
जवाहर चौकातील पुराचे पाणी ओसरल्याने बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळपासून एसटी बस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. तर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सज्ज केली आहेत. अणुस्कुरा घाटामध्ये काल दरड कोसळली होती; मात्र बांधकाम विभागाच्या यंत्रणेच्या तत्परतेमुळे ती दरड काही तासातच दूर करण्यात आली व वाहतूक पूर्ववत करण्यात आली. याठिकाणी आजही वाहतूक सुरळीत सुरू आहे.

सध्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू असून नागरिक सुरक्षित आहेत. प्रशासन आणि सर्व संबंधित यंत्रणा सतत अलर्ट मोडवर आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. लोकांनी गरज नसताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button