
प्रथमच उद्धव ठाकरेनी संजय राऊत यांचा निर्णय चुकीचा ठरविला,
राज्यभरातून विरोध झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषेविषयीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्रानुसार इयत्ता पाहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाणार होती.पण सरकारच्या या धोरणाला विरोधकांनी मोठा विरोध केला होता. काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही, अशी भूमिका ठाकरे गट, मनसे, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी घेतली होती. दरम्यान, सकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी 5 जुलै रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. मात्र सरकारने हा निर्णय जाहीर केल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी घाईघाईने ट्विटरवर आता हा मोर्चा होणार नाही असे जाहीर करून टाकले होते मात्र त्यानंतर थोड्याच वेळात झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हा मोर्चा होणार असे जाहीर केले त्यामुळे प्रथमच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचा निर्णय चुकीचा ठरवल्याचे बोलले जात आहे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णयच रद्द केला असला तरी हा मोर्चा होईलच. असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी मनसेचे नाव घेत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाही नवे आवाहन केले आहे.
राज्य सरकारने हिंदी भाषेविषयीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचा 5 जुलै रोजीचा मोर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याबाबतचा संभ्रम ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूर केला आहे. येत्या 5 जुलै रोजीचा मोर्चा होणारच आहे. फक्त या मोर्चाचे स्वरुप वेगळे असेल. ही विजयी रॅली असेल किंवा अन्य दुसरे काही असेल, पण काहीही झालं तरी 5 जुलै रोजी आम्ही एकत्र जमणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी यावेळी सर्वच पक्षांनी या विजयी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी मनसेचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाही या विजयी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.