माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक असल्याचा निर्णय घेतल्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा असावाच, अशी ठाम भूमिका घेतली आहे.दिवाळीनंतर बोर्डाच्या पथकांकडून राज्यातील सर्वच केंद्रांची तपासणी होणार असून सीसीटीव्ही नसलेल्या केंद्राची विशेषत: नवीन केंद्रांची मान्यता रद्द होणार आहे. त्यामुळे आगामी परीक्षेचे रेकॉर्डिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होणार असल्याने परीक्षा कॉपीमुक्त होईल, असा विश्वास बोर्डाला आहे.इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नांदेड, लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळाअंतर्गत राज्यात तीन ते पाच हजार केंद्रे आहेत. बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी मागील वर्षीपासून सरमिसळ पद्धत सुरू केली आहे. पणज्या केंद्राच्या एक ते तीन किमी अंतरावर दुसरे परीक्षा केंद्र नाही, त्याठिकाणी ही पद्धत नव्हती.आता आगामी परीक्षेवेळी सर्वच केंद्रांसाठी ही पद्धत अवलंबली जाणार आहे. दुसरीकडे प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने तेथील प्रत्येक हालचाल बोर्डाच्या अधिकाऱ्यांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण परीक्षा कॉपीमुक्त होईल, असा विश्वासही बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button