कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीकडे जाण्याकरता येत्या २३ ऑगस्टपासून नव्याने रेल्वे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून एक आनंदाची बातमी आहे. बोरीवलीवरून थेट कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीकडे जाण्याकरता येत्या २३ ऑगस्टपासून नव्याने रेल्वे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नामुळे हा मोठा निर्णय घेण्याची माहिती मुंबई येथील बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे. नवीन रेल्वेमुळे मुंबई येथील उपनगरात राहणार्‍या चाकरमान्यांची मोठी सोय होणार असून गेल्या कित्येक वर्षांची मागणी आता पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आलं असून आता थेट बोरवली ते सावंतवाडी असा प्रवास करता येणार आहे. ‘चला येवा कोकण आपलोच असा आणि आता बोरिवली इथून गाडी आपल्याला मिळताच असा’, अशी कोकणी स्टाईलने साद घालत या गाडीची माहिती आमदार राणे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button