
रत्नागिरी विमानतळासाठी जागा देणारे ग्रामस्थ अद्यापही मोबदल्याच्या प्रतीक्षेत,
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारिकरण आणि खासगी विमान वाहतुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे. तालुक्यातील तिवंडेवाडीतील सुमारे १८.६८७ एकर खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र त्या जमिनिपैकी अनेक ग्रामस्थांना प्रशासन स्तरावरून अजून मोबदला न मिळाल्याने येत्या 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थ उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. रत्नागिरी विमानतळाच्या विस्तरिकरणाचे काम वेगात सुरू झालेले आहे. यामध्ये रत्नागिरी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रिक्वेंन्सी ओम्री डायरेक्शनल रेडिओ रेंज ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. विमानतळासाठी आवश्यक पॅरॉलल टॅक्सी ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहे. येणाऱ्या विमानाला तत्काळ धावपट्टी रिकामी करून देण्यास त्याचा फायदा होणार आहे. संस्थापित नेविगेशनला या उपकरणामुळे विमानांशी हवाई संपर्क साधता येणार आहे. रत्नागिरी विमानतळ काही वर्षे तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. सागरी किनापट्टीच्या सुरक्षेसाठी गोवा ते मुंबई या दरम्यान मध्यवर्ती ठिकाण म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात दलाचा तळ उभारण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा तळ अतिशय महत्वाचा आहे. काही वर्षांपासून त्याचे विस्तारिकरण सुरू आहे. धावट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक कामे बाकी आहेत. मात्र काही अडचणी अजूनही कायम आहेत. दुसरे विमान आले तर धावपट्टी रिकामी असणे आवश्यक आहे. म्हणून विमान पर्किंगला मोठी जागा लागणार आहे. त्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी तेथील चव्हाण यांची जमीन करारावर वापरायला घेण्याची मागणी केली होती. त्याची प्रक्रिया सुरू असताना आता जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील तिवंडेवाडी येथील १८.६७८ एकर खासगी जमीन संपादित करण्याची अधिसूचना जारी केली. प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळ रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीम (आरसीएस) योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे एकंदरच पर्यटन, उद्योग व विमान वाहतूक यांना प्रोत्साहन मिळून रत्नागिरीत विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या साऱ्या विस्तारणिकरणासाठी , येथील ग्रामस्थांनी विकासासाठी कमी मोबदला असतानाही आपल्या शेती बागायती असलेल्या जागा दिल्या आहेत. पण अजूनही अनेकांना मोबदला मिळालेला नाही. संबंधित प्रशासनातील कर्मचारी देखील त्या मोबदल्याच्या कार्यवाहीसाठी समर्पक उत्तरे देत नसल्याचे बाधित ग्रामस्थांतून बोलले जात आहे. या बाबत येत्या 15 ऑगस्ट रोजी मोबदला न मिळालेले ग्रामस्थ उपोषण आंदोलन करण्याचा तयारीत आहेत.तर रत्नागिरी दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री यांना भेटून ग्रामस्थ निवेदनाद्वारे कैफियत मांडणार आहेत.