
नव्या राष्ट्रीय धोरणाच्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी विद्यार्थी करणार किमान ३ प्रकल्प
नव्या राष्ट्रीय धोरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शालेय शिक्षण आराखड्यातील मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत तयार केलेला राज्य आराखडा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध झाला आहे. यातील विविध तरतुदीनुसार सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यातील प्रस्तावित प्रकल्पकार्य आणि आंतरविद्याशाखीय विषयांचा मुद्दा विशेषतः शिक्षणवर्गामध्ये चर्चेचा बनला आहे.राज्य अभ्यासक्रम आराखड्यात ३ री पासून १२ वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थी दरवर्षी किमान ३ प्रकल्पांवर काम करणे प्रस्तावित आहे. आराखड्यात प्रकल्प कार्यासाठी ३ क्षेत्रे निर्धारित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सजीव आधारित कार्य, यंत्र व सामग्री सहकार्य विषयक कार्य आणि मानवी सेवाधारित कार्य अशी तीन क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्येकी शैक्षणिक वर्षात यातील प्रत्येक क्षेत्रातील किमान १ याप्रमाणे कमीत कमी ३ प्रकल्प करणे अपेक्षित आहे. ३ रीपासून १२ वीपर्यंत १० वर्षात यामुळे किमान ३० प्रकल्पांवर प्रत्येक विद्यार्थी कार्य करणार आहे. यासाठी पहिल्या गटात ६५, दुसर्या ४५ तर तिसर्या वर्षात ५९ अशी एकूण १६९ क्षेत्रे सुचविण्यात आली आहेत. www.konkantoday.com