
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राज्यातआंबा महोत्सवातुन तब्बल 17 कोटींची उलाढाल
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत राज्यात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत ‘आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. पुणे मुख्यालय, पुणे विभागासह कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, संभाजीनगर या विभागांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये तब्बल 17 कोटींची उलाढाल झाली. सर्वाधिक 14 कोटी रुपयांची उलाढाल ही पुणे मुख्यालय येथे झाली.
विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱयांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा, हा महोत्सवाचा उद्देश असतो
www.konkantoday.com