रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक शिवसेनेकडून स्वबळावर : शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप साळवी

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक शिवसेनेने एकट्याने स्वबळावर लढावी, यासाठी आपण वरिष्ठांकडे मागणी करणार असल्याचे शिवसेना  तालुकाप्रमुख तथा रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बुधवारी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके उपस्थित होते. चाळके म्हणाले, राजापूर, रत्नागिरी, देवरूख व चिपळूण नगर पालिकेसह जिल्हा परिषदेवर यावेळी शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद असली तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिकाही विचारात घेतली जाणार आहे. देवरूख व चिपळूण नगर पालिकेवर भाजपची सत्ता आहे. यावेळी शिवसेना दोन्ही ठिकाणी भगवा फडकावणार आहे. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व आहे. याठिकाणी राष्ट्रवादीच्याही जागा आहेत. काँग्रेसचा एक सदस्य आहे. त्यामुळे नेतेमंडळी चर्चा करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत योग्य निर्णय घेतील, असेही चाळके यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button