ईगल फाउंडेशनचा राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार सोहळा गणपतीपुळेत उत्साहात पार

उत्तम नियोजन, विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करुन ईगल फाउंडेशन अनेकांना प्रोत्साहन देत आहे. असे स्पष्ट प्रतिपादन आ.रामहरी रुपनवर यांनी केले .ते ईगल फौंडेशनच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.प्रोत्साहन हे शक्तीवर्धकाचे काम करते.अजुन ताकदीने काम करण्यास प्रोत्साहन देते.आ.रुपनवर साहेब यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. श्री चिमन डांगे म्हणाले,या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मला भाग्य मिळाले.भविष्यात ईगलच्या सोहोळ्यास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रा.अरुण घोडके यांनीही आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री प्रविण काकडे यांनीही शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे स्वागत सागर पाटील ,प्रकाश वंजोळे यांनी केले.प्रास्ताविक विलासराव कोळेकर यांनी केले. यावेळी गणपतीपुळे येथे आमदार रामहरी रुपनवर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अॅड. चिमण डांगे, सुप्रसिद्ध वक्ते अरुण घोडके, आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे, ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.अप्रतिम स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन व कोल्हापूरी फेटा बांधून गौरवण्यात आले.विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी फाउंडेशन तर्फे सन्मानित केले जात असल्याचे अध्यक्ष श्री कोळेकर यांनी सांगून यंदा शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, व्यवसाय, राजकारण आदी क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच राज्याबाहेरील मान्यवरांचा फाउंडेशन च्या वतीने सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले.
अत्यंत प्रभावी सुत्रसंचालन श्री माधव अंकलगे यांनी केले.आभार सागर पाटील यांनी मानले. सोहोळ्यासाठी सागर पाटील, प्रकाश वंजोळे, उदय महाकाळ, संजय शितप,बापुसाहेब कांबळे,बाबासाहेब राशिनकर, प्रतापराव शिंदे ,संजय मयेकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी श्री गजानन पाटील व श्री दिलीप देवळेकर यांचा मानपत्र देवून विशेष सत्कार करण्यात आला.तसेच बाबासाहेब राशिनकर, स्वराजराजे राशिनकर, श्री शिवाजी वाडकर ,बापुसाहेब कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
ईगल फौंडेशन चे गरुडझेप पुरस्कार-२२ चे पुरस्कार ॲड.अरुण देशमुख ,श्री मिहीर गांधी ,डॉ.कृष्णा माळी ,श्री मच्छिंद्र घोडके ,श्री संजय बैकर ,मैनोदीन शेख ,श्री सतिश कानवडे ,श्री दशरथ खैरनार,श्री नानासाहेब मालुंजकर,सौ.अर्चना मिनानाथ शेळके,सौ.आशा सुनिल पाटील ,प्रा.विजय कोष्टी ,श्री अनंत आखाडे ,श्री रविंद्र कोकाटे ,श्री शरद पळसुलेदेसाई,अलिमिया इब्राहिम काझी ,इम्तियाज सिद्दिकी ,डॉ.चंद्रकांत सावंत,सौ.संगिता शिवाजी शिंदे,सौ.ज्योती अरविंद सदानशिव,सौ.गिता अतुल शिंदे ,सौ.प्रतिक्षा तावडे,मैत्रीबंध प्रतिष्ठान संस्था,श्री केदार कुंभार ,श्री आनंदा गणपती जाधव ,श्री बाळकृष्ण पाटसुते ,श्री संजय देवरूखकर,श्री स्वप्निल कोळी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button