अवैध मासेमारीवर कारवाईसाठी मच्छीमार आक्रमक

रत्नागिरी : अवैध मासेमारीवर कारवाईसाठी रत्नागिरी तालुका शाश्‍वत मच्छीमार संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी या संघटनेची बैठक झाली. यात पुढच्या आठवड्यापासून धरणे आंदोलने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल मुरकर यांनी सांगितले. राज्य सागरी मासेमारीच्या सुधारित कायद्यानुसार अवैध मासेमारीवर कारवाई करताना सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त कार्यालयाकडून हात आखडता घेतला जातो. अवैध मासेमारी करणार्‍या नौका पकडून दिल्या जात आहेत. नौकांचे चित्रीकरण पाठवले जाते. अशांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी वेळेवर घटनास्थळी पोहोचत नाहीत. केलेल्या कारवाईवरील पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत स्वत:हून दखल घेतली जात नाही. शाश्‍वत मच्छीमार संघटनेला पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतरच हालचाल होत आहे. त्यामुळे कारवाई तातडीने होण्यासाठी धरणे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अध्यक्ष मुरकर यांनी
सांगितले. बैठकीला अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष खलिल वस्ता यांनी सुधारित कायद्याबाबत मार्गदर्शन केले. अवैध मासेमारीवर कारवाई न करणार्‍या जिल्हा प्रशासनाचा निषेध करत असल्याचे मच्छीमार आप्पा वांदरकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button