मुंबईत बोरिवलीमधील शांतीवन परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये हा प्राणी पाेहत आला

मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पाणीही साचलं. विशेष म्हणजे या पावसाचा फटका केवळ मुंबईकरांना बसला असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्राण्यांनाही बसलाय. याच मुसळधार पावसाचा प्राण्यांना बसलेल्या फटक्याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.
मध्यरात्रीच्या सुमारास बोरिवलीमधील शांतीवन परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये एक हरीण वाहून आलं. छतापर्यंत बुडलेल्या गाड्या आणि त्या पाण्यामधून वाट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ शूट करणारे नागरिक खरोखर हे हरीण आहे का? असा प्रश्न सुरुवातीला विचारतात आणि नंतर हरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते हाका मारताना दिसत आहे. मात्र हे हरीण या लोकांजवळ येतं आणि पुन्हा पाठ फिरवून गाडीच्या मागे निघून जातं. हे हरीण इथे नक्की कुठून आणि कसं आलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button