
आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेऊनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल -आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकार चिंतेत आहे. तूर्तास कठोर निर्बंध लावले जातील मात्र परिस्थिती आणखी चिंताजनक झाल्यास लॉकडाऊन लावण्याशिवाय सरकारपुढे पर्याय उरणार नाही, अशी भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मांडली. राज्यातील कोरोना स्थिती, रुग्णसंख्या आणि उपलब्ध बेड्ससह इतर आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेऊनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असेही टोपे म्हणाले.
www.konkantoday.com