
मच्छिमारांवरील संकट कायम, वादळी वार्यामुळे समुद्रात गेलेल्या नौका परतल्या
मासेमारीच्या नव्या मुहूर्ताला १ ऑगस्टपासून सुरूवात झाल्यानंतर काही प्रमाणात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वादळी वार्यांमुळे पुन्हा किनार्यावर दाखल झाल्या आहेत. पहिल्याच मोसमात कोळंबी, बांगडा असे मासे मिळत होते. मात्र निसर्गाने पुन्हा एकदा दणका दिल्याने मासेमारी ठप्प झाली आहे.
मासेमारी बंद कालावधी ३१ जुलैपर्यंत होता. त्यानंतर १ पासून मासेमारी हंगामाला सुरूवात झाली. ट्रॉलिंग, गिलनेटसारख्या नौकांना मासेमारीसाठी परवानगी आहे. मात्र यावर्षी हंगामावर कोरोनाचे सावट आहे.
www.konkantoday.com
