
डिझेलचे वाढते दर व बदलते वातावरण यामुळे मच्छिमार व्यवसायाला मोठा फटका
समुद्रात वाढलेले वारे आणि पौर्णिमेचे चांदणे यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम झाला असून, मच्छीमारांना अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. रोजच्या खर्चा इतकीही मासळी मिळत नसल्याने यंदा पर्ससीन नौका नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर आधीच बंदरावर शाकारून ठेवण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, बाजारात मासळीचा तुटवडा निर्माण होऊन दरही वाढले आहेत.
दरवर्षी १० मेपासून पर्ससीन नौका बंदरात ठेवण्याची प्रक्रिया सुरू होले मात्र यंदा सुमारे ५० टक्के नौकांनी आधीच मासेमारी थांबवली आहे. छोट्या नौकांनाही समुद्रातील बदललेल्या वातावरणाचा स्थलांतरित होते, तसेच समुद्रातील वारेही वाढतात. त्यामुळे मासेमारी करणे अवघड होते.
www.konkantoday.com




