
लोकशाही दिन ; प्रलंबित अर्ज मार्गी लावावेत- मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे
*रत्नागिरी, दि.4 : लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज लवकरात लवकर मार्गी लावावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे, अधीक्षक भूमी अभिलेखसचिन इंगळी, प्र.जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार आदींसह उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेतला. नव्याने दाखल अर्जांबाबत काय कार्यवाही केली, याबाबतही संबंधित विभागाने अहवाल देण्याबाबत सांगितले. प्रलंबित अर्ज तसेच लोकशाही दिनात येणारे अर्ज तात्काळ मार्गी लावावेत, असेही त्या म्हणाल्या.
क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.




