
रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भातपिकांचे प्रचंड नुकसान भरपाई देण्याची आ. भास्कर जाधव यांची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळे आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच कोकणातील शेतकर्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना उबाठा गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह कृषीमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोकणात गेल्या दहा बारा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक भिजून आडवे पडले आहे. त्यांना पुन्हा कोंब फुटले आहेत. तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके अक्षरशः सडत आहेत.
www.konkantoday.com




