
अकरावी प्रवेश ऑफलाईन सुरू करा, लांजा शहरामध्ये पालकांची मागणी
राज्य शासनाच्या ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे लांजा शहरासह तालुक्यातील सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविना असून त्यांच्या पुढील शिक्षणाबाबत गडद सावट निर्माण झाले आहे. आपल्याला अकरावी प्रवेश मिळणार की नाही? या संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तीव्र नाराजी असून ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर सोमवारी लांजातील पालक वर्ग व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकार्यांची भेट घेत निवेदन सादर केले व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. यावर्षीपासून अकरावी प्रवेशांसाठी शासनाने ऑनलाईन प्रणाली लागू केली आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी व नियोजनाच्या त्रुटी आढळल्याने अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळू शकलेला नाही. शाळा, महाविद्यालयांना सुरुवात होऊन दोन महिने उलटून गेले तरीही अकरावीच्या विद्यार्थ्यांच वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत.
www.konkantoday.com