रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळेच्या सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांचा अविश्वास ठरावाच्या आधीच राजीनामा


रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळेच्या सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता; परंतु त्या ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच सरपंच रांगणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची वेळ आलेली नाही.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गट भाजप व शिंदे गट यांच्यामध्ये निवडणूक झाली होती. त्यामध्ये थेट सरपंच निवडणुकीत शिंदे गटाच्या रांगणकर या बहुमताने निवडून आल्या होत्या. सात सदस्यांमध्ये एक सदस्य भाजप व सहा शिंदे गट निवडून आले. या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायत सदस्यांमधून प्रसाद सुनील तोडणकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. दोन वर्षे व्यवस्थित कारभार चालू असतानाच सरपंच रांगणकर यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचा कारभार केला जात असल्याचा आक्षेप सदस्यांकडून घेण्यास सुरुवात झाली. सरपंचांच्या काही निर्णयामुळे गावामध्ये अनेक अडीअडचणी निर्माण होत असल्याचे सदस्यांचे मत होते तसेच निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसल्याचीही नाराजी सदस्यांनी व्यक्त केली आहे. सरपंचांच्या मनमानी कारभाराविरोधात अखेर सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला. हा ठराव तहसीलदारांना सादर करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांनी सरपंचांच्या विरुद्ध असलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या दाखल ३० जूनला सुनावणीचे आदेश देण्यात आले; परंतु २५ जूनलाच सरपंच रांगणकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button