मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी परिसरात दोन अपघातात चार जखमी


रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी आणि हातखंबा-झरेवाडी येथे दोन द वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडे अपघात घडला. यातील फिर्यादी व जखमी रवींद्र गोविंद पाचकुडे (४३, रा.करबुडे-पाचकुडेवाडी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील दुचाकीवर (एमएच-०८-पी-४४१२) पाठीमागे पत्नी अस्मिता पाचकुडे हिला बसवून करबुडे ते रत्नागिरी असे येत होते. ते निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडील वळणात आले असता समोरुन येणारा ट्रेलर (केए-२२-डी-५३०३) वरील चालकाने रस्त्याच्या उजव्या बाजूला येत त्यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात पाचकुडे दांपत्य दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने रवींद्र पाचकुडे यांच्या डोक्याला, हातांना गंभीर दुखापत झाली, तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली.
अपघाताची दुसरी घटना शनिवारी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास हातखंबा-झरेवाडी येथे घडली. या अपघातातील दुचाकी चालक पियूष प्रेमकुमार भारती (१९, रा. खेडशी-गयाळवाडी, रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न दुचाकी (एमएच-०८-एवाय-०२८६) वर पाठीमागे त्याचा मित्र ॠषीकेश शिवराम बावधने (२४, रा. पांगरी, रत्नागिरी) याला सोबत घेऊन माचाळला फिरण्यासाठी जात होते. ते झरेवाडी स्टॉपजवळील वळणात आले असता पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणारा ट्रक (जीजे-०३-बीव्ही-०१०८) ला त्याने धडक देत अपघात केला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button