साखरी नाटे येथे होत असलेल्या नवीन मच्छिमार जेटीच्या प्रक्रियेला स्थानिक मनसेचा विरोध.-जिल्हा ध्यक्ष अविनाश सौन्दळकर.

साखरीनाटे येथे मच्छिमार जेटीचे काम जोरात सुरु करण्यात आलेत आहे. जेटी मंजुरीआधी जनसुनावणी घेण्यात आली होती सदर जनसुनावणी वेळी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांचे मार्गदर्शनखाली मनसेचे उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांनी 13 तांत्रिक मुद्दे उपस्थित करून सदर प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. तरीही जनसुनावणी तशीच पुढे रेटविण्यात आली. तशाच पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून कार्य आरंभ आदेश देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे पण यावरील आमच्या आक्षेप असलेल्या मुद्यावर अद्याप उत्तरे देण्यात आली नाहीत.

प्रस्तावीत जेटी परिसरात कांदळवन आहे त्याचा नाश होणार आहे मग येथील जैव वैविधतेचे काय होणार? येथील अप्रोच रोड कसा असणार? वाहनतळ स्वच्छतागृह मलनीस्सारण व्यवस्था काय आहे? भविष्यात नौका दुरुस्ती मुळे सांडणारे तेल व वंगण यां मुळे होणाऱ्या प्रदूषणचे काय? यां व अशा अनेक प्रश्न माणसेच्या तांत्रिक समितीनें उपस्थित केले आहेत ज्याची उत्तरे आजतागायात देण्यात आली नाही आहेत.

या संदर्भात मेरिटाइम बोर्ड लां आक्षेप पत्र देण्यात आले असून येत्या 8 दिवसांत उत्तरे मिळाली नाहीत तर पुढच्या शुक्रवारी उपोषण करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. सदर पत्र देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर विधानसभा अध्यक्ष जुनेद बंदरकार रत्नागिरी उपजिल्हाअध्यक्ष अरविंद मालाडकर राजापूर तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर उपतालुकाध्यक्ष जयेंद्र कोठारकर रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button