मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होण्यास अजून दोन ते तीन तास लागण्याची शक्यता


मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे सकाळी 7.45 वाजता एलपीजी टँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये मिनी बसमधील 29 शिक्षक आणि एक चालक जखमी झाले. यामध्ये 16 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सध्या मागील सहा तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.अपघात होताच एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरु झाली. या गॅस गळतीमुळे बावनदी पुलाजवळील घरांना आग लगाली. तसेच अनेक गाड्याही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आजूबाजूच्या परिसरात असणारी आंब्याची कलम देखील जळाली. मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 5 तासांपासून ठप्प आहे. महामार्ग सुरू होण्यासाठी आणखी 3 तास लागू शकतो. दरम्यान, यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. अपघातानंतर पलटी झालेला टँकरमधून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती सुरू असून खबरदारी म्हणून गोव्यावरून येणारी वाहतूक पाली आणि उक्षी मार्गे वळवली तर मुंबईहुन गोव्याकडे जाणारी वाहतूक संगमेश्वरमार्गे वळवली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button