
शासनाकडून विमा कंपन्यांना रक्कम न मिळाल्याने शेतकर्यांना भरपाई नाही.
शासनाकडे कोकणातील काजूसाठी हमीभाव मागणी केली. मात्र मागणीकडे दुर्लक्ष करीत शासनाने काजू उत्पादकांना प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. ते अद्यापही शेतकर्यांना मिळालेले नाही. तर राज्य सरकारने आपल्या हिश्श्याची काजू फळपिक विम्याची रक्कम ३४० कोटी विमा कंपनीला न दिल्यामुळे फळपीक विमा भरपाईही मिळाली नसल्याने काजू उत्पादक हवालदिल झाले आहेत. www.konkantoday.com