
मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ने घेतली जबाबदारी.
*मुलांची शैक्षणिक प्रगती होत असताना इ.९ वी व इ. १० मध्ये शिक्षण घेण्यासाठी काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती मुळे परिक्षेत आधीक गुण मिळविण्यासाठी कमी पडतात.अशा वेळी गरजू,अभ्यासू आणि हुशार विद्यार्थी इ ९ वी व इ.१० मध्ये यंदा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई येथील एका प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तके,नोटस, सराव पेपर्स हे देवून त्यांना संपूर्ण वर्षभर अचूक मार्गदर्शन करणार आहे,या पॅकेज ची एका विद्यार्थ्याची वर्षाची फी रु १५०००/- इतकी आहे अशा २५ विद्यार्थ्याचा आर्थिक भार स़ंस्था उचलणार आहे.
हा संपूर्ण खर्च संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने HKCK Edutack ltd, Mumbai यांचे सौजन्याने होणार आहे,आता असे गरजू २५ विद्यार्थी निवडले असून त्या़ची नोंदणी करण्यात आली आहे .या २५ विद्यार्थ्यांना दि.१८ मे २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता सुहेल मुकादम यांचे जयस्तंभ रत्नागिरी येथील कार्यालयात बोलाविण्यात आले असून मुंबई येथील तज्ज्ञ मंडळी या विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चा हा यंदाचा पहिलाच शैक्षणिक उपक्रम असून यंदा ५० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या उपक्रमासाठी संस्थेचे मुंबई अध्यक्ष फिरोज कोंडकरी यांनी मोलाची कामगिरी केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे* *तरी या उपक्रमाला कोणी गरजूंना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे*