
कोकण बोर्डातील २७,८४१ विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार.
इयत्ता दहावी परीक्षेचा मंगळवारी १३ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २७,८४१ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड राज्यात प्रथम येणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता.कोकण विभागात इयत्ता दहावीसाठी२७,८४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. रत्नागिरीत ७३ व सिंधुदुर्गमध्ये ४१ अशी ११४ परीक्षा केंद्र होतील. तसेच रत्नागिरी मध्ये १३ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ असे एकूण २२ परीरक्षक कार्यरत होते. रत्नागिरी जिल्ह्यात ४३४ शाळा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२३ अशा ६५७ शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.