
वाटप केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी बांधकाम कामगारांचे एमआयडीसीतील साहित्य वाटप केंद्र बंद.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर व राजापूर तालुक्यात जीवित नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संचाचे रत्नागिरी एमआयडीसी ठिकाणचे वाटप केंद्र गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आले आहे.सद्यस्थितीती तालुक्यातील सी-५ पिनोअर ब्रिक्स मिरजोळे, एमआयडीसी येथे वाटप सुरू आहे. पण येथे नागरिकांची गर्दी होत आहे. काही महिलावर्ग रात्रीपासून येथे वस्तीला येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रसंगी त्यांच्या सुरक्षेचा विचार करता व गर्दी टाळण्यासाठी एमआयडीसी ठिकाणचे वाटप केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर नियोजन करण्यात येवून ग्रामपंचायतनिहाय अत्यावश्यक गृहोपयोगी संच वाटप करण्यात येईल असे सहाय्यक कामगार आयुक्त आयरे यांनी कळविले आहे.www.konkantoday.com