वाटप केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी बांधकाम कामगारांचे एमआयडीसीतील साहित्य वाटप केंद्र बंद.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्‍वर व राजापूर तालुक्यात जीवित नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व गृहोपयोगी संचाचे रत्नागिरी एमआयडीसी ठिकाणचे वाटप केंद्र गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आले आहे.सद्यस्थितीती तालुक्यातील सी-५ पिनोअर ब्रिक्स मिरजोळे, एमआयडीसी येथे वाटप सुरू आहे. पण येथे नागरिकांची गर्दी होत आहे. काही महिलावर्ग रात्रीपासून येथे वस्तीला येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रसंगी त्यांच्या सुरक्षेचा विचार करता व गर्दी टाळण्यासाठी एमआयडीसी ठिकाणचे वाटप केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर नियोजन करण्यात येवून ग्रामपंचायतनिहाय अत्यावश्यक गृहोपयोगी संच वाटप करण्यात येईल असे सहाय्यक कामगार आयुक्त आयरे यांनी कळविले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button