भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘फेक न्यूज’चा सुळसुळाट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत.इतकेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांसंबधीचे बनावट व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चुकीचे दावे केले जात आहेत. या संपूर्ण प्रकार रोखण्यासाठी आणि खोटी माहिती पसरू नये या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून सरकारने नागरिकांना फेक न्यूज बद्दल जागृत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.तुम्हाला सोशल मीडियावर एकाखी चुकीची माहिती देणारी बातमी किंवा फोटो, व्हिडीओ आढळून आल्यास याबद्दल आता तक्रार करत येणार आहे.

राज्य सरकारडून अशा ‘फेक न्यूज’बद्दल तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक आणि इमेल आयडी देण्यात आला आहे.तसेच दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात एखादी माहिती शेअर करण्यापूर्वी सामान्य नागरिकांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल देखील सरकारने माहिती दिली आहे.हे कराकेवळ अधिकृत मार्गदर्शक सूचना, मदत क्रमांक संपर्क आणि मदतीविषयीची पडताळून पाहिलेली माहिती सामायिक करा.कोणतीही बातमी सामायिक करण्यापूर्वी त्याची अधिकृत स्त्रोतांद्वारे तथ्य पडताळणी करा.खोट्या बातम्यांविषयी तात्काळ तक्रार कराहे करू नकासैन्य दलांच्या हालचाली विषयीची माहिती सामायिक करू नका.पडताळून पाहिली नसलेली माहिती कोणालाही पुढे पाठवू नका.

हिंसा अथवा सामाजिक तणाव निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतील अशा पोस्ट टाळा.येथे करता येईल तक्रारमाहिती जबाबदारीपूर्वक सामायिक करा, राष्ट्रीय सुरक्षेला सहकार्य करा. कोणतीही चुकीची माहिती आढल्यास #PIBFactCheck कडे तक्रार करा, असे अवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला WhatsApp: +91 8799711259, ईमेल: socialmedia@pib.gov.in या क्रमांकावर किंवा इमेल आयडीवर संपर्क साधा असेही सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button