
संगणक परिचालकांचेउद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांना साकडे
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने आपल्या अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्यांबाबत आता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांना साकडे घातले आहे. ग्रामपंचायत संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा तसेच किमान वेतन अशा मागण्यांचे निवेदन नुकत्याच गुहागर दौर्यावर आलेल्या सामंत यांना देत न्याय देण्याची मागणी केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, मागील सुमारे १२ वर्षापासून ग्रामीण जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावीत संगणक परिचालकांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन या मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. संगणक परिचालकांचे ७००० रुपये असलेले मानधान १०,००० रुपये करण्यात आल्याचा प्रशासन निर्णय १९ जून २०२४ रोजी निमित्त केला आहे, परंतु सदरील मानधनवाढ ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून केल्याने राज्यातील ग्रामपंचायतींनी या मानधनवाढीस विरोध केला आहे. www.konkantoday.com