हातीस पुलाचे काम अंतिम टप्यात, ७ ते ८ कि.मी. ने अंतर कमी होणार.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील हातीस येथील पीर बाबरशेख देवस्थानाकडे जाण्याचे अंतर आता ७ ते ८ किलोमीटरने कमी होणार आहे. कीरबाग-हातिस जोडणार्‍या पुलाच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. काजळी नदीवर सुमारे ६ कोटींच्या निधीतून ८० मीटर लांबीचा पूल बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. अंतिम टप्प्यातील हे काम लवकरच पूर्णत्वास जाऊन हा मार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. हातीस येथील पीर बाबरशेख हे ठिकाण प्रसिध्द धार्मिकस्थळ असून पर्यटन नकाशावर आलेले आहे.

पण याठिकाणी जाण्यासाठी रत्नागिरीतून काजरघाटी-टेंबेपूल मार्गे जावे लागते. तर सोमेश्वरमार्गे तोणदे गावापर्यंत वाहनाचा प्रवास, तर पुढे काजळी नदीतून होडीतून प्रवास ’करण्याशिवाय पर्याय नसतो. नदीतील होडीतून होणारा प्रवास सुखकर असला तरी पावसाळ्यात त्यावर बंधने येतात हातीसहून हरचिरी, चांदेराई, टेंबेपूल, तोणदे, सोमेश्वर या भागातून ये-जा करणार्‍या नागरिकांना वाहनांद्वारे मोठा वळसा घालूनच प्रवास करावा लागतो. मात्र पा प्रवासासाठी मारावा लागणारा सुमारे ७-८ किलोमीटरचा वळसा आता कमी होणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button