तिरंग्याच्या रंगांनी उजळला रत्नागिरीतील स्कायवॉक
रत्नागिरी : हर घर तिरंगा अभियान देशभर राबवले जात असून रत्नागिरी शहरातही विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. या अभियान अंतर्गत रत्नागिरी शहरातील माळनाका येथील स्कायवॉकवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. केशरी, पांढरा, हिरवा असे लाईट लावण्यात आले असून ही रोषणाई लक्षवेधी ठरत आहे. शुक्रवारी सायंकाळी तिरंगी रोषणाई करण्यात आली. यामुळे माळनाका परिसरातील वातावरणात
चैतन्य निर्माण झाले आहे. या लक्षवेधी रोषणाईसोबत अनेक नागरिकांनी सेल्फी देखील काढला.