
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने नाराजी
रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थिती १०० फुट उंच झेंड्याचे लोकार्पण करण्यात आले.रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे शिवसेनेचे आहेत त्यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये भाजपाला निमंत्रणच दिले नसल्याचे कळते.भाजपच्या कोणत्याही पदाधिकार्याला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले गेले नाही त्यामुळे त्यांना डावले गेल्याने भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे.याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.खरे तर शासकीय कार्यक्रमांना जिल्ह्यातील प्रमुख पक्षाचे नेते,माजी सैनिक,प्रतिष्ठित नागरिक इ. निमंत्रण दिले जाते.परंतू राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपला दूर ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com