
पर्यटकांसाठी महाराष्ट पर्यटन सुरक्षा दल स्थापन करणार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, राज्यातील पर्यटनस्थळे, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश आहे. १ ते ४ मे दरम्यान पार पडलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात येणार्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, राज्यातील सांस्कृतिक इतिहास कायदा नियम, पर्यटनविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळ आणि मेस्कोने त्यांच्याकडील कर्मचार्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत. पर्यटन पोलीस संकल्पमुळे पर्यटनस्थळांवरील शाश्वत पर्यटनपद्धती टिकवून ठेवण्यासाठी, शाश्वत पर्यटनाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील.www.konkantoday.com