
जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिका घटल्या.
शिधापत्रिकांचा आढावा राज्य पातळीला घेतला जात असताना अंत्योदय योजनेतील ग्राहक संख्या कमी झाली. प्राधान्य गटात जवळपास ७ हजार शिधापत्रिका धारकांची वाढ झाली असून सुमारे ६०० धारकं अंत्योदय योजनेत कमी झाले. प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी माहिती दिली की, १ एप्रिलला राज्य सरकारने शिधापत्रिकांची नवी संख्या निश्चिती केली आहे.
यापूर्वी ३९ हजार १३० एवढा अंत्योदय योजनेसाठी शिधापत्रिकाधारकांचा इष्टांक होता. तो आता ३८ हजार ५३५ वर येऊन पोहोचला आहे. प्राधान्य गटामध्ये यापूर्वी १० लाख १३ हजार लाभार्थी शिधापत्रिकाधारक होते. ते आता १० लाख २० हजार ३०७ वर जाऊन पोहोचले आहेत. प्राधान्य गटात ७ हजार शिधापत्रिकाधारकांची वाढ झाली असून अंत्योदय योजनेमध्ये ६०० लाभार्थी कमी झाले आहेत.www.konkantoday.com