मच्छीमार समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार; नितेश राणे यांची ग्वाही.

शेकडो वर्षांपूर्वीपासून मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागणार आहेत, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांनी दिली.अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांची शुक्रवारी (ता. ३) त्यांच्या सुवर्णगड बंगल्यात बैठक झाली.

यावेळी राणे यांच्यासोबत समितीच्या शिष्टमंडळाची विविध प्रश्नांवर चर्चा झाली. समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील, सचिव जयेश तांडेल, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल भोईर, पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, मच्छीमार नेते रवींद्र पांचाळ आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button